शुक्रवार, १९ डिसेंबर, २०१४

कैसे खत्म होगी तेरी ये दहशत, ये तो सारा गुलशन जला रही है.
कल क़त्ल किये जो मासूम तूने, उनकी माँ अब भी लोरी गा रही है.

ख़त्म करना तो तुज़े वाज़िब नहीं क्यों के तू भी तो एक इंसान है.
कहासे आयी ये नफरत तुज़मे, तेरा भी तो कोई भगवान है.

में मरने के लिए तैयार हु, बशर्त तुज़े सारी नफरत भुलानी होगी
जीतनी गोलिया है तेरे सलाह खानेमे सारी मेरे दिल मे उतारनी होगी।

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०१४


Interstellar 2015 

पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अखिल मानव जात नाश पावण्याच्या मार्गावर आहे. नासा एका महत्वाकांक्षी योजनेवर काम करत असते ज्यात काही साहसी अंतराळ वीरांना ते नवीन पृथ्वीच्या शोधा साठी अंतरिक्षात पाठवणार असतात. त्यासाठी ते काही अनुभवी अंतराळवीरांची निवड करतात. कुपर एक अनुभवी वैमानिक. आमेलिया एक जिज्ञासू खागोल्शास्त्राद्न्य. आणि भारतातून एक महान खगोल, गणित, आणि भौतिक शास्त्रद्न प्रो. मकरंद अनाजपुरे.
अनाजपुरे हे  ग्रामीण भागून आलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक. सोबत त्यांच्या त्यांनी खास अंतराळ प्रवासासाठी तयार केलेला रोबोट "नर्साळ्या".
अनाजपुरे आपल्या सोबत त्यांचे शास्त्रज्ञ गुरु अशोक सराफ यांना पण घेण्याची विनंती करतात पण प्रो. ब्रान्ड त्यास नम्र नकार देतात.

टीम दोन प्लान तयार करते. प्लान A नवीन राहण्याजोगा ग्रह शोधायचा आणि पृथ्वीवरील माणसांना तेथे हलवायचे.
प्लान B.   अनाजपुरे यांच्या सिद्धांता नुसार. जे काही पृत्थ्वीवर घडते त्या घटनेच्या प्रकाश व धव्नि लहरी अंतराळात जाऊन स्थिरावतात. आणि प्रत्येक काळाचा एक समय प्रतल तयार होतो. हिंदू धर्माचा रिती नुसार श्राध्द आणि त्यात उच्चारलेल्या मंत्र धव्नि लहरी त्या त्या समय प्रतलात जाउन त्या व्यक्तींना पुन्नर जीवित करते. त्या मुळे तो समय प्रतल फक्त पुनः प्रत्यय न राहता एक प्रती शृष्टी बनतो.

अनजपुरे यांच्या म्हणण्या नुसार हिंदू प्राचीन वैज्ञानिकांकडे(ऋषीमुनी) विश्वनिर्मित व विश्व लय या दोघांची उकल आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शनि ग्रहाजवळ "वरवंटा" नावाचे वर्म होल आहे तेथून त्या प्रतलात शिरकाव केला जाऊ शकतो.  आणि त्यांच्याशी संपर्क साधून पृथ्वीच्या सध्यस्थिती बद्दल काही मार्ग शोधत येईल. अनाजपुरे आपल्या काही मागण्या प्रो. ब्रान्ड पुढे ठेवतात. १. यानात देवपूजेची एक स्वतंत्र खोली पाहिजे. २. अधून मधून त्यांच्या घरच्यांशी संपर्क झाला पाहिजे आणि ३. रोज सकाळी मटा ची digital कॉपी यानावर पोहोचली पाहिजे. प्रो. ब्रान्ड त्या नुसार सर्व व्यवस्था करतात आणि यान मानवजातीच्या उद्धारा साठी एका महान प्रवासाला सुरवात करते.

साडेतीन वर्ष प्रवास करून यान "वरवंट्या" जवळ पोहोचते "वरवट्यात" प्रवेश करून यान समय प्रतल जाळ्यात पोहोचते. एका समय प्रतला जवळून जात असताना प्रोफेसर आपल्या मयत आजी आजोबांना भेटण्यासाठी यान त्या समय प्रतलात वळवण्याची विनंती करतात. पयलेट कुपर या गोष्टीवर आक्षेप घेतात. टीम मीटिंग होते. त्यात प्रोफेसर फार जोर देतात आणि भेट पटकन आवरण्याची हमी देतात, शेवटी काही काळासाठी यान वळवण्याचा निर्णय घेतला जातो. प्रोफेसरांची आजी आजोबांची भेट होते. भेट झाल्यावर यान पुढच्या प्रवासाला निघते.

दरम्यान साडेतीन वर्षाच्या प्रवास काळात आमेलिया आणि प्रोफेसारांमध्ये फारच जवळीक वाढते. प्रोफेसर तिला "पृथ्वी वाचेल तेव्हा वाचेल. पण मानवजातीच्या कल्याणासाठी आपण यानातच प्रजननाचे प्रयोग चालू करणे किती गरजेचे आहे" हे पटवून देतात. अर्थात कुपर चा  त्याचा आक्षेप असतो.

यान पुढील एका समय प्रतला जवळून जात असताना प्रोफेसर शिवाजी महाराजांची भेट घेण्यासाठी यान वळवण्याची वीनंत करतात. यावर वैमानिक कुपर यांचा तोल ढळतो आणि दोघांमध्ये प्रचंड हाणामारी होते. आधी कुपर प्रोफेसरांना मारतात, मग प्रोफेसरांना कुपर मारतात मग पुन्हा कुपर प्रोफेसरांना मारतात. आमेलिया मध्ये पडून दोघांना सोडवते. एक टीम मीटिंग होते त्यात यान न थांबवता पुढे नेण्याचा निर्णय घेतला जातो.

शेवटी ते पुराण काळातील योजिलेल्या प्रतलात पोहोचतात. तिथे काय घडते? काय त्यांना पृथ्वी वाचवण्याचा मार्ग सापडतो? हि रंजक कथा आहे इंटर स्टेलर मध्ये. अवश्य पहा. 

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४

Kavita

बरेच दिवस एक कविता मनात घर करून होति. आज ती शब्दांची लयाची कसलीच तमा न बाळगता कागदावर उतरली.
(एका बस थांब्यावर दोन चवदा वर्षाच्या मुली आहेत. एक एकटी आहे. एक पालकांसोबत आहे.)

कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ? तुला दुनिये पासून झाकतात तर मला  उघड्यावर टाकतातकुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?  

पदर आला तेव्हापासन तुझ्या आईबापान तुला दुनिये पासन झाकलीतेव्हांच या भडव्यांनी मला बाजारात टाकली. तुझ्या पाठीवर हात फिरावरत तर माझ्या छातीवर हात टाकतात. कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?

तू ज्यांना अंकल, काका, पप्पा म्हणते ना त्यांना आम्ही "मरद" म्हनतो. काळे बिद्रे, उघडे केसाळ, रोज माझ्या अंगाला झोंबतात. तुझ्या समोर सभ्य बनून राहतात, तुला मायेन वागवतात आनि मला रात्रभर जागवतात. कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?

सकाळ होता होता पोट कंबर दुखाया लागत, डोळ्यात पाणी वहाया लागतं. त्या टाइमला  तू गाड झोपलेली असते. तुझी माय तुझं पांघरून नीट करत असते.  मला आपले आपाच आसू पुसाया लागतात. कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?

तुला जशी माय हायेना तशी मला  हाये, तिचं नाव भाकर हाये. ती पोटात गेली कि उब मिळते, फार दिवस ताटातूट झाली कि रडू फुटते. तिच्याच साठी हे भडवे मला त्यांच्या इशाऱ्यावर नाचवतात. कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?

तुझ्या जवळ जशी बाहुली हायेना ना तशी मला पण मिळणार हाये. एक बाबा म्हनतो ती माझ्या पोटातून येणार हाये. तिला  काडून टाक असे सगळे सांगतात. कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?

तुझ जग रंगीन गुलाबी, माझं काळ शराबी. तुझ्या चेहऱ्यावर येनार  हसू काही वेगळच हाय. माझ्या चेहऱ्यावर ते कधी आलच नाय. लई वाटत मी पण तुझ्या जगात यावं, बाहुली बरोबर खेळावं, रात्री शांत निजाव. पण माझ्या कडून तुझ्या जगात येणार रस्ताच नाय. अश्या कश्या आयुष्यभर पुरनाऱ्या  बेड्या पायत टाकतात.


कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ? तुला दुनियेपासून झाकतात तर मला  उघड्यावर टाकतात. कुनास ठाऊक हे लोक  माझ्याशी असे का वागतात ?